वर्णन : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर, कुटुंबाला रु. 20000/- ची मदत पुरवली जाते.
पात्रता :
1. अर्जदार कुटुंब हे दारिद्र्य रेषेखालील असावे.
2. मयत व्यक्तीचे वय मृत्युच्या वेळी 18 ते 60 वर्षे यामध्ये असावे.
3. मयत व्यक्ती कुटुंबाची प्रमुख कमावणारी असावी. ती स्त्री किंवा पुरुष कोणीही असू शकते.
4. रहिवासी राज्य = महाराष्ट्र
5. मृत्यू होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसावा.
प्रक्रिया :
1. तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागाला किंवा तहसीलदार कार्यालयाला योग्य कागदपत्रांसह भेट द्या.
2. तुम्हाला ह्या योजनेचा अर्ज कुटुंबाती एकमेव कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एका वर्षाच्या आत करावा लागेल.
3. अर्जदार हा मृत्यू झालेल्या व्यक्तीचा कायदेशीर वारस असावा. जर मृत व्यक्तीचे मृत्युपत्र उपलब्ध नसेल तर बायकोला/नवऱ्याला किंवा मुलांना कायदेशीर वारस मानलं जाईल.
4. अर्जदाराच्या बँक खात्यात लाभ पाठवला जाईल.
जर मृत्यू स्थानिक क्षेत्राच्या बाहेर झाला असेल तर मृत्युपत्र मिळण्यासाठी वेळ लागु शकतो, अशा वेळी मृत्यूपत्रासाठी अर्ज लवकरात लवकर करावा.
लाभ : एकरकमी रु. 20000 अर्थसहाय्य
Some more Government Schemes
तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या नवीनतम सरकारी योजना आणि लाभांबद्दल अद्ययावत रहा.